-A A +A
Theme trigger
Blue
Default Apply
Green
Brunswick Green Apply

महाऑरेंज

राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादित होत असलेल्या संत्र्याची देशांतर्गत विपणन व्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर संत्रा निर्यातीस चालना देण्याच्या दृष्टीकोनातून महाऑरेंज या शिखर संस्थेची स्थापना दिनांक 10 मार्च, 2008 रोजी करण्यात आलेली असून, सद्यस्थितीत महाऑरेंज च्या एकूण 5 सभासद संस्था आहेत. महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या सहकार्याने महाऑरेंज मार्फत विविध शहरांमध्ये संत्रा महोत्सवांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन करून आणि त्यामध्ये सहभागी होऊन संत्रा उत्पादकांना चांगले विक्री दर प्राप्त करून देण्याच्या कामकाजास सुरुवात करण्यात आलेली आहे. निर्यातयोग्य गुणवत्तेच्या संत्रा उत्पादनासाठी शेतक-यांमध्ये जागरुकता निर्माण होण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमांचे तसेच शेतकरी मेळाव्याचे आयोजन करून शेतक-यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

महाऑरेंजची उद्दिष्टे -

  • संत्रा व मोसंबी फळांची देशांतर्गत विक्री व्यवस्था वृध्दींगत करणे.
  • निर्यातक्षम फळ निर्मितीला प्रोत्साहन देऊन दर्जेदार उत्पादनांची निर्मिती करणे.
  • सुगी पश्चात हाताळणीचे तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचविणे.
  • संत्रा उत्पादक शेतक-यांच्या सहकारी संस्थांची साखळी निर्माण करून उत्पादक आणि ग्राहक यांचा थेट संबंध प्रस्थापित करणे.
  • विपणन व्यवस्थेसाठी कोरुगेटेड बॉक्स, वातानुकुलित व्हॅन्स, शीतगृहे इत्यादींची उपलब्धता करून देणे.
  • संत्रा प्रक्रिया प्रकल्प तसेच फ्रुट व ज्यूस पार्लरची निर्मिती करणे.
  • देश विदेशातील अद्ययावत ज्ञान व संशोधन शेतक-यांपर्यंत पोहोचविणे.